पूरग्रस्तांसाठी डोंबिवलीतील महाविद्यालयीन विद्यार्थी सरसावले...


डोंबिवली :- ( शंकर जाधव  ) अतिवृष्टीने महाराष्ट्रातील ठीकठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. पूरग्रस्त मदत करण्यासाठी विविध क्षेत्रातून मदतीचे हात पुढे आले. डोंबिवलीतील महाविद्यालयातील विद्यार्थ्यानीहि या मदतकार्यात पुढाकार घेतला.मॉडेल, मंजुनाथ, प्रगती आणि वंदे मातरम या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन अन्नधान्य आणि वस्तू जमा केल्या. या वस्तू आणि अन्नधान्य पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे.अभाविचे मिहीर देसाई यांनी पूरग्रस्तांना मदत मिळावे म्हणून पुढे आले आहे.आमची ईश्वराकडे प्राथर्ना करत कि, महापूर कधीही येऊ नये अशी वेळ कोणावरही येऊ नये.

Post a Comment

Previous Post Next Post