तीर्थक्षेत्र असलेल्या कवाना या गावचा विकास रखडला


हदगांव:-( प्रतिनिधी शुभम तुपकरी )

 हदगाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या या गावी विकास झाला नाही असे मतव्यक्त गावकऱ्यांनी मुंबई डेटलाईन 24’शी बोलताना सांगितले विशेष म्हणजे या गावला सरपंच गावकऱ्यांनी बिनविरोध निवडून दिला या गावात ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकानी ग्रामसभा देखील घेतली नाही व या गावला ग्रामसेवक असलेल्या  मोरे मॅडम  त्यांचा कारभार त्यांचे पतिराजच  पाहत असतात असे गावकऱ्यांनी सांगितले  गावात कधी ग्रामसेवक येत नाहीत व फोन केला तर कोणत्या कामासाठी उडवाउडवीचे उत्तर देतात असे देखील गावकऱ्यांनी सांगितले या गावात रस्ते नाल्या झाल्या नाही या गावला मागील अकरा महिन्यापूर्वी तीर्थक्षेत्र हे दर्जा मिळाला पण या गावच्या विकासावर आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीने लक्ष नाही दिले या गावला पाणी भरपूर आहे पण नळकनेक्शन ग्रामपंचायत नागरिकापर्यंत देऊ शकली नाही कवाना येथील ग्रामस्थ सतीश चेपुरवार यांनीबोलतांनी सांगितले

Post a Comment

Previous Post Next Post